Monday, 29 October 2018

CATASTROPHIC RAIN ESSAY IN MARATHI

                               CATASTROPHIC RAIN ESSAY IN MARATHI                                                                       प्रलयकारी पाऊस
       पाऊस हा माणसाचा मित्र, त्याचा पोशिंदा, सर्व सृष्टीचाच तो जीवनदाता! पण याच जीवनदात्या पावसाने त्या दिवशी अक्राळविक्राळ रूप धारण केले आणि मुंबईसह महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार माजवला.
     तो दिवस होता २६ जुलै २००५. आदल्या रात्रीपासूनच पावसाने संततधार लावलीहोती.सकाळीसुद॒धा तो कोसळतच होता. मुंबईकरांना आपल्या कामाच्या घाईमुळे इकडेतिकडे बघायला फुरसत नव्हती. दिवस पुढे सरकत होता. मुंबईची गती वाढत होती आणि पावसाचा जोरही वाढतच होता. अगदी थोड्याच काळात तो भूतो भविष्यति' असा कोसळला आणि मग जाणवू लागले की, हे काहीतरी विपरीतच घडत आहे.
      त्यातच ती भरतीची वेळ होती. सगळीकडे पाणी वाढू लागले. रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेल्यामुळे धावणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या. रस्ते जलमय झाल्याने मोटारीदुचाकी वाहने, बसेस जागच्या जागी थांबल्या आणि थोड्याच वेळात मुंबईची दळणवळण यंत्रणा बंद पडली. भरीत भर म्हणजे अनेक ठिकाणी टेलिफोन, मोबाइल यंत्रणादेखील बंद पडली
        सकाळी घराबाहेर पडलेली माणसे घरी परतू शकत नव्हती. रस्त्यावरून पाण्याचे प्रचंड लोंढे वाहत होते, त्यांत कित्येक गोष्टी, माणसे, जनावरे वाहून जात होती. असा प्रलय यापूर्वी कधीच झाला नव्हता. वरून पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद पडला होता माणूस अगतिक होऊन जागच्या जागी थांबला.
        अशा या प्रलयात एका असामान्य गोष्टीचा साक्षात्कार झाला. माणसांतील माणुसकी जागी झाली. पावसात सापडलेल्यांना, घरी जाऊ न शकलेल्यांना इतर लोक मदत करू लागले. कुणी पाणी दिले, कुणी चहा, कुणी जेवण, कुणी आसरा...
       कोसळणाऱ्या पावसामुळे कुठे डोंगराचे कडे कोसळले. गरिबांच्या झोपड्या माणसांसह त्याखाली गाडल्या गेल्या. वर्षानुवर्षे लोकांनी जोडलेले किडूकमिडूक पाण्यात वाहून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर कमी झाला. ठप्प झालेले जनजीवन मंद गतीने हलू लागले आणि नुकसानीचा अंदाज घेऊ लागले. आता भीती होती रोगराईची. साऱ्या महाराष्ट्रात या कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार माजवला होता. गावेच्या गावे वाहून गेली होती.एरवी हवाहवासा वाटणारा पाऊस त्या दिवशी नकोनकोसा झाला होता!




"for supporting me please click on ads"





Sunday, 28 October 2018

POLLUTION-A FIERCE CRISIS ESSAY IN MARATHII

                                 POLLUTION-A FIERCE CRISIS ESSAY IN MARATHII  
                                       प्रदूषण-एक भयंकर संकट 
प्रदूषण हे एवढे मोठे संकट आहे की, सारे विष्व आता याबाबत खडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी 'वसुंधरा दिन' पळून 'वसुंधरा बचाव' हा संदेश सर्वाना दिला जातो.
       वसुंधरेमुळे आपण या जगात सुखासमाधानाने राहू शकतो, याचा विसर या वसुंधरापुत्रांना पडला आहे आणि ते आपल्या प्रत्येक कृतीने वसुंधरेवरील प्रदूषण वाढत आहेत. प्रदूषण हे मानवनिर्मित आहे; पण या मानवाला त्याची जाणीवच नाही.
       माणूस आपल्या बुद्धीने नव्या नव्या गोष्टी सुरु करतो, पण त्याच वेळी आपली कृती प्रदूषणाला कारण आहे का, याचा विचार तो करत नाही. उंच उंच इमारती बांधण्यासाठी त्याने जंगल तोड केली त्यामुळे पावसाचे प्रमाण घटले. जमिनीची धूप वाढली.
       माणसे आपल्या अचाट बुद्धिमत्तेने अनेक कारखाने सुरु केले,अनेक प्रकारची वाहने शोधून काढली. त्यामुळे प्रदूषण वाढले. माणसाला अत्यंत आवश्यक असते ती शुद्ध हवा. दूषित हवेमुळे अनेक आजार वाढतात. माणसे, पशु, पक्षी  मृत्युमुखी पडतात. कित्यक दुर्मिळ वनस्पती नष्ट होतात.    
       गिरण्या-कारखान्यांतील दूषित पाणी नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी प्रदूषित होते. अशा प्रदूषित पाण्यामुळे गावेच्या गवे रोगग्रस्त होत आहेत. माणसाला आपले सर्वस्व वाहणाऱ्या नदीला प्रदूषित करताना माणसाला मात्र थोडीही खंत वाटत नाही.
       माणसाने प्लास्टिकचा शोध लावला आणि त्याला स्वर्ग हाती आल्यासारखे वाटते. अनेक गोष्टींसाठी त्याने प्लास्टिक आवरणांचा उपयोग सुरु केला; पण त्यामुळे  घनकचरा वाढू लागला. प्लास्टिक कुजत नसल्याने  हा कचरा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. शेतीतील पिकांवर कीड पाडू नये,म्हणून औषधे फवारली जातात. अशा औषधांमुळे वातावरण प्रदूषित होतोच; पण अशा अन्नध्यांचा माणसाच्या प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होतो.
       हवा पाणी यांच्या होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणेच आणखी एक प्रदूषण आहे ते म्हणजे ध्वनिप्रदूषण. आपल्याभोवती सतत कर्कश आवाज होत असतात.  कर्कश आवाजात लावलेली कर्णे आसमंताची शांतता नष्ट करतात. त्यामुळे मनाची शांतताही नष्ट पावते. अशा वातावरणात लोक कार्यक्षमतेने कामे करू शकत नाहीत एवढेच न्हवे, तर त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतो. त्यांची आयुर्मर्यादा घटते.   
       या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे माणसाचे  आरोग्य बिघडत आहे. एवढेच न्हवे, तर त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. माणसाला जिवंत राहायचे असेलतर, तर प्रदूषण नाहीसे करावे लागेल


"for supporting me please click on ads"

TEACHER'S DAY ESSAY IN MARATHI

                                        TEACHER'S DAY ESSAY IN MARATHI                     
                         शिक्षकदिन 
        दरवर्षी सप्टेंबरला  भारतात शिक्षकदिन साजरा केला जातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस. डॉ. राधाकृष्णन हे थोर विद्वान आदर्श असे शिक्षक होते, म्हणून सप्टेंबर हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
           दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षकदिनाला शाळेची सर्व जबाबदारी आम्ही विद्यार्थी घेतो. वरच्या इयत्तांमधील मुले खालच्या इयत्तांच्या वर्गात जाऊन अध्यापनाचे काम करतात. वर्गातील सर्व मुलांना शांत ठेवून कोणत्याही विषयातील एखादा भाग त्यांना समजावून देणे हे किती अवघड काम आहे, हे आम्हाला अनुभवाने त्यावेळी उमगते. विद्यार्थ्यापैकीच कोणीतरी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिपाई यांची भूमिका पार पडतात. ते आपापली कामे गंभीरपणे मोठ्या रुबाबात करत असतात. शाळेतील इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपण वेगळे दिसतो, असाच पोशाख त्यावेळी केलेला असतो. शिपाई बनलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची घंटा वाजवण्याचे तर अप्रूप वाटते.
       अध्यापनाचे काम करताना नकळत आपल्या आवडत्या शिक्षकांचे अनुकरण केले जाते. शिक्षकांनाही ते पाहताना मजा वाटते. मग हे विद्यार्थी-शिक्षकांच्या शाळेतील वर्ग नेहमीपेक्षा लवकर सुटतात आणि आम्ही सर्व वियार्थी शिक्षक शाळेच्या सभागृहात  जमतो. तेथे आजचे विद्यार्थी-शिक्षक  आपला शिकवण्याचा अनुभव सांगतात. त्यानंतर शिक्षकाची भूमिका  उत्तमरीत्या पार पडलेल्या  विद्यार्थ्यांचा सत्कार होतो. तसेच आमच्या शिक्षकांचा सत्कार केला जातो. त्यांच्यातून आदर्श शिक्षकाची निवड केली जाते. त्यांचाही विशेष गौरव केला जातो.
         दरवर्षी सप्टेंबरला राष्ट्रपतींकडून आदर्श शिक्षकांची नवे जाहीर होतात त्यांचा सत्कार होतो. असाच सत्कार राज्याराज्यांतून नागरानगरांतून केला जातो. शिक्षक देशासाठी, राज्यासाठी, गावासाठी जे महान कार्य करतात त्याबाबत कृतज्ञाता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सर्वजण मनोमन 'गुरु:साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ' असे म्हणत या सोहळ्यात सहभागी होतात

      आपल्याकडे फार पूर्वीपासून गुरुपौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञाता व्यक्त करण्यची परंपरा आहे. सप्टेंबरला आपण हीच प्राचीन परंपरा पुढे नेट असतो


"for supporting me please click on ads"